Demo Site

Sunday, August 28, 2011

बाप

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो...

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,

कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं...

सुरू होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात,

एटीकेटीच्या चक्रातून, वर्षं पुढे सरत जातात,
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात,
माझा बाप ठाऊक नाही, म्हणत धमक्‍या गाजत असतात...

परीक्षा संपते, अभ्यास सरतो, डिग्री पडते हाती याच्या

नोकरी मिळवत, नोकरी टिकवत, कमावू लागतो चार दिडक्‍या,
आरामात पसरणारे बाजीराव, घोड्यावरती स्वार होतात,
नोकरीच्या बाजारात, नेमानं मोहिमा काढू लागतात...

नोकरी जमते, छोकरी सापडते, बार मग उडतो जोरात,

एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करू लागतात,
दोघांच्या अंगणात मग, बछडं तिसरं खेळू लागतं,
नव्या कोऱ्या बापाला, जुन्याचं मन कळू लागतं...

नवा कोरा बाप मग, पोरा सवे खेळू लागतो,

जुना बाप आता नव्याने आजोबाच्या कायेत शिरतो,
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळात
एकाला दिसतो दुसरा लहान, दुसरा पाहतो गोष्ट महान...

रंगलेल्या गोष्टीत या, मग शिरतो फ्लॅश बॅक

बापाच्या भूमिकेतून, पोर पाहतो भूतकाळ
लेकरासाठी मग त्याला कळवळणारा बाप दिसतो,
त्याची लाल रेघ जो, उरात घेऊन फिरत असतो...

कडकपणाच्या आवरणाखाली, झुळझुळणारं पाणी असतं,

भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं,
दोन घास कमी खाईल; पण पोरांना गोड देतो,
हट्टासाठी पोरांच्या ओव्हरटाईम तो मारत असतो...

डोक्‍यावरती उन्ह झेलत, सावली तो देत असतो,

दणाणत्या पावसापासून, कुटुंब आपलं जपत असतो,
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो,
आईच्या मऊशार तळव्यामागचा, तोच राकट हात असतो...

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही,

बाप कधी उतत नाही नि बाप कधी मातत नाही,
पोरं सोडतात घरटं अन्‌ शोधू लागतात क्षितिजं नवी
बाप मात्र धरून बसतो, घरट्याची प्रत्येक काडी...

पोरांच्या यशासोबत त्याचं मन हसत असतं,

अपयश पचवताना, ते आतून रडत असतं,
काही झालं, कितीही झालं, तरी कणा ताठ असतो,
खचलेल्या पोराला तोच तर उभारी देत असतो...

सारी कथा समजायला फार मोठं व्हावं लागतं,

बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं,
आकाशाहून भव्य अन्‌ सागराची खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते...

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय,

बापमाणूस असतो तो, बापांशिवाय कसा कळणार?
असतं न्यारंच रसायन, त्याची फोड उकलत नाही,
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही...

करणार कशी कविता कोण, तो त्यात मावत नाही,

चार ओळीत सांगण्यासारखा बाप काही लहान नाही,
सोनचाफ्याचं फूल ते, सुगंध कुपीत ठरत नाही,
बाप नावाच्या देवाचा, थांग कधी लागत नाही...

केला खरा आज सायास, त्याला थोडं शोधण्याचा,

जमेल तेवढा सांगितला, आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं, त्याच्याशिवाय जमत नाही,
आईमार्फत बोललं तरी, बोलल्याशिवाय राहवत नाही...

सांगतो आता शेवटचं, कान थोडा इकडे करा,

आभाळ पेलून धरण्यासाठी, आभाळाचाच श्‍वास हवा,
बाप नावाच्या पारिजातकाचं, असंच काहीसं जिणं असतं,
ते समजून घेण्यासाठी बापच असणं भाग असतं...

Friday, August 26, 2011

पाऊस भेट


  • पाऊस भेट तो नाही म्हणाला सकाळचा सोनेरी सूर्यप्रकाश . रस्त्यावर जणू सोनेरी सडाच टाकलेला. आणि समोर तो.उंच.रुबाबदार. त्याला पाहताक्षणी माझी दुनियाच बदलून गेली. इथे-तिथे-जिथे तिथे मला तोच दिसायचा. मी नववीत असेल तेव्हा. तो खूप खूप हुशार, शांत. त्याचं बोलणं, हसणं, बसणं, वागणं सारंच मला आवडायचं. त्याचं दर्शन झालं की, पूर्ण दिवस मी खूप आनंदात राहायचे. घरची सर्व कामं करताना डोक्यात तोच असायचा. त्या नादात कामही चांगलं व्हायचं. मला सतत त्याच्यासारखंच व्हायचं होतं. हुशार, परफेक्ट. त्याच्यासारखाच अभ्यास करायचा होता. मला त्याचाच ध्यास लागला होता. मी अभ्यासाला लागले होते, कारण तो खूप अभ्यास करायचा. मार्क्‍स चांगले पडायला लागले. मी हुशार मुलगी म्हणून ओळखले जाऊ लागले. मन बहरू लागले. माझ्या मनातल्या प्रेमानं चांगलंच बाळसं धरलं होतं. त्यात माझ्या घरी गरिबी अमाप. मी स्वकष्टानं शिकत होते, भावंडांना मदत करत होते. कधी कधी उपाशी झोपावं, तर झोपही येत नसे. पुस्तक वाचत जागी राहायचे. पण मनात जिद्द होती आणि समोर तो होता माझी प्रेरणा म्हणून उभा.! मी प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन घवघवीत यश मिळवायचे. फलकावर नाव झळकायचं. वाटायचं तो वाचेल माझं नाव, त्यानं वाचलं समजा तर त्यापेक्षा दुसरं मोठं बक्षीस नाही.! माझ्या घरचा खूप विरोध, कॉलेजला जायला नकारच होता. लग्न करून टाकायची घाई. मी दिसायलाही चारचौघीत उठून दिसणारी, लाघवी, हुशार. दोन-तीन नोकरदार स्थळं आली; पण मी ठाम नकार दिला. मी रोज पहाटे उठून देवाजवळ बसून प्रार्थना करायचे, माझ्या वडिलांना मला शिकवण्याची सुबुद्धी दे देवा, अशी भीक मागायचे. पण, सगळं व्यर्थ. ते तयार नव्हतेच. पण मी लाख प्रय} केले. अखेरीस परवानगी मिळाली. ड्रेस नाहीत, पैसे नाहीत. हे प्रश्न तर फार लांबचे होते. मी कशीबशी अकरावी सायन्सला अँडमिशन घेतले. कॉलेजला गेले, अभ्यास मन लावून केला. प्रेम हृदयाच्या कप्प्यातच बंद करून टाकलं. बी.एस्सी. झाले. पुढे एम.एस्सी.साठी विद्यापीठात गेले. आता स्वातंत्र्य मिळाले होते मला माझी वाट निवडण्याचे. दरम्यान, तो डॉक्टर होणार होता. आम्ही कधीही बोललो नाही, भेटलो नाही; पण त्याच्या आठवणीशिवाय माझा एक क्षणही गेला नाही. एक दिवस ठरवलं, त्याला भेटायचं. सांगायचं खरं काय ते.! त्याला फोन केला. तीनशे किलोमीटरचे अंतर पार करून त्याला भेटायला गेले. महिनाभराचे मेसचे पैसे खर्च करून त्याच्या शहरात पोहचले. तो भेटला. सोबत त्याचे आणखी दोन मित्र होते. बाहेर जोराचा पाऊस बरसत होता. मन खुलवत होता. माझ्या मनात जपलेलं नऊ वर्षं प्रेमाचं गुपित मी आज त्या पावसाच्या साक्षीनं सांगणार होते. आम्ही दोघं पावसाच्या सरीसोबत चालत होतो. त्याचे मित्रही मागे सोबत चालत होते. मी त्याला सारे सांगितले, मी त्याच्याचमुळे जगायला शिकले हेदेखील सांगितले. त्यानं सारं ऐकून घेतलं. आणि. ‘नाही’ म्हणाला.! मी गहिवरले. डोळ्यातून उधाणलेले अर्शू मला थांबवता आले नाही; पण पावसासोबत तेही धुतले गेले. मी परत बसमध्ये चढले. माझ्या गावी परत आले. सारे संपले होते. ज्याच्यासाठी, ज्याच्यामुळे जगत होते. तो फक्त ‘नाही’ म्हणाला. पण जगणं थोडीच थांबणार होतं. नाहीच थांबलं. पुढची काही वर्षं माझे हात रोज वीस-वीस तास काम करत होते. मी नोकरी केली. पुढे पाच वर्षांनी विवाह झाला. मुले झाली. सारं आयुष्य चाकोरीतून आनंदाच्या वाटेवर जगायला लागलं. पण.? ती ‘पाऊसभेट’ मात्र दरवर्षी आठवते.पाऊस जगवतो सार्‍या जगाला.त्यानं मला जीवदान दिलं. तो नाही म्हणून मी थांबले नाही उलट मनाचा एक कोपरा कायम ओलाचिंब असतो.आणि जन्मभर राहीन.! - सागरराणी-- ऑक्सिजन (लोकमत ) मध्ये आलेला एक लेख

Some most BEAUTIFUL Photo Effects Like


You see the same ol’ stuff on Facebook all the time that make you cringe — low-resolutionwebcam photos, or a photo of you taken by yourself with a camera reflecting in the mirror. I’m not pointing fingers, but as Drake said recently: I’m just saying you could do better.
Here are three easy, free, and fantastic services that you can use to enhance your photos, profile pictures, display pictures, and even landscape photos. Check them out!

IMAGEOID

If you need quick adjustments like embossing or adding a border (as seen in image below), or quick color effects such as grayscale or sepia, or even slightly more complex such as reflections and adding noise, ImageOid is a great free and fast tool that you can use totouch up photos.
ImageOid User Interface
In the top section (1) of the screenshot, there is the selection of various effects. There 32 effects at the time of writing, a lot of which are color modifications and simple effects, such as blur and emboss. Some of these effects are actually part of Adobe Photoshop, and while not as adjustable, they certainly are a great free option to turn towards.
In the right section (2) of the screenshot, you can undo and redo effects that you choose to apply to your photograph, similar to Photoshop’s History tool.
The beauty of ImageOid lies in the details. For example, it just takes a second to make changes and undo them — it’s really quite a speedy process. Additionally, it remembers the image you last loaded in the browsing session, and will do so until you change the image or reset ImageOid.
If you’re looking to make some quick tweaks to your photographs, check out ImageOid!

VINTAGEJS

Lately, the vintage-style photograph has made a comeback. VintageJS tweaks your photographs by adding a faded, vintage look to them.


VintageJSHighlighted are the eight options you can choose to modify. I’m pretty pleased with the final result, although I’d prefer to have the option that can control how many black spots the screenlayer puts over your photo. Nonetheless, you can judge for yourself the final result and experiment with it on your own photographs.
Try VintageJS out now!

TILTSHIFT

Now, I’m no professional photographer — in fact, I’m not even a hobbyist. While I love those cool lenses that allow you to blur large areas and create all these cool focusing effects, I’d prefer to spend my money elsewhere. If you’re anything like me, I’ve got just the right toolfor you to keep you satisfied with your pictures’ effects while not burning a hole through your pocket.
TiltShift Linear
With TiltShift, you can adjust various characteristics of the picture, as illustrated in the screenshot above. The key here is that you can create a linear blur (as seen above), or also a radial blur (as seen below).
TiltShift Radial
Some effects also include different lighting properties, as well as moving where you want the blur center point to be. It’s a really useful tool — in this case, especially for landscapes. Unfortunately, my lack of photography equipment has led me to also have a severe lack of cool photographs to use in these kinds of demonstrations.
Try TiltShift right now!
All these services are free and available online, which means you can take a quick five minutes out of your day to quickly check them out and play around.
If you are thirsty for more photography webapps, check out Dermandar, which allows you tocreate panoramic photos.

Tuesday, August 23, 2011

राहुल गांधी



भारताच्या युवराज तुझ्या passport वर तुझे नाव राहुल गांधी नसून RAUL VINCI आहे.

तुम्ही लोक गांधीचे नाव फक्त राजकारणसाठी वापरता. हेच खरे सत्य आहे. आणि अजून

आमचे लोक तुम्हाला गांधीच्या नावाने मते देतात.

जरा विचार कर कि तू RAUL VINCI या नावाने निवडणूक लढवत आहेस.

गोकुळाष्टमी / गोपाळकाला / दहीहंडी / दहीकाला



तिथी व इतिहास
श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असतांना झाला.
वैशिष्ट्य
`गोकुळाष्टमी' या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव, तसेच `ॐ नमो भगवते वासुदेवाय ।' हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरीत्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात कार्यरत असलेल्या श्रीकृष्णतत्त्वाचा आपल्याला लाभ मिळतो.

उत्सव साजरा करण्याची पद्धत
गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.

Wednesday, August 17, 2011

लोकपाल बिल" मध्ये नक्की काय आहे? ...



१. केंद्रामध्ये "लोकपाल" नावाची संस्था काढली जाईल आणि प्रत्येक राज्यामध्ये या संस्थेचा "लोकायुक्त" निवडला जाईल.




२. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोग यांच्याप्रमाणेच लोकपाल आयोग हा सुद्धा शासनापासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. कोणताही सारकारी अधिकारी किंवा नेता या आयोगावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.




३. भ्रष्टाचाराचा कुठलाही खटला वर्षानुवर्षे चालणार नाही. चौकशी साठी जास्तीत जास्त १ वर्ष आणि खटल्यासाठी १ वर्ष दिला जाईल, जेणेकरून २ वर्षांत शिक्षेची अंमलबजावणी होईल.


Tuesday, August 16, 2011

अण्णा हजारे ह्यांचे डॉ. मनमोहन सिंह ह्यांना एक पत्र


डॉ. मनमोहन सिंह  
 एक पत्र
पंतप्रधान,
भारत सरकार,
नवी दिल्ली


प्रिय. डॉ. मनमोहन सिंह जी!

मला हे पत्र अतिशय खेदाने लिहावं लागतंय. मी यापूर्वी 18 जुलै रोजी आपल्याला एक पत्र लिहून सांगितलं होतं की सरकारने जर संसदेत सशक्त लोकपाल विधेयक मांडलं नाही तर मी पुन्हा 16 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करेन. त्याच पत्रात मी असंही सांगितलं होतं की माझं हे उपोषण तोपर्यंत सुरू राहील, जोपर्यंत सरकार सशक्त लोकपाल विधेयक म्हणजे जनलोकपाल विधेयकातील सर्व तरतुदी असलेलं विधेयक संसदेत मांडलं जात नाही.

Sunday, August 14, 2011

निरागस प्रेम कि प्रेमभंग

रोजसकाळी bus stop वर ७ च्या गाडी ला ,
उभी असते ती जशी,
दिसावी ती म्हणून रोज, तिच बस पकडतो.
तिच्या मागे चढण्यासाठी मी लाईनहि तोडतो.

कधी सलवार, कधी जीन्स, कधी मिडी, कधी साडी.
हतात म्याचींग पर्स अन डोळ्यावर गॉगलची काडी.
पिंगट कर्ली केस तिचे अन कपाळावर फ्लिक्स.
हातात म्याचींग घड्याळ अन चपला हाय हिल्स.

Friday, August 12, 2011

रक्षाबंधन

हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.

Monday, August 8, 2011

प्रेम रोग....

आताच विश्वसनीय सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार एका खूप मोठ्या रोगाचा शोध लागला असून तो खूप घातक रोग असे डॉक्टरांचे मत आहे. त्याचे नाव ‘प्रेम रोग’ असे ठेवण्यात आले आहे. यावर अधिक संशोधन करून त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. परंतु सध्याला तरी यावर कोणताही कोणताही इलाज नाही. त्यामुळे सध्याला ‘सावधानता हाच उपाय’ आहे. या रोगाची दाहकता चाचापण्यासाठी बॉलीवूडचा एक स्टार सलमान ‘उघडे’ किंवा सुप्रसिद्ध नोज सिंगर हिमेशभा’ऊs’ रेशमिया यांची माहिती मिळवावी. जगभरात अनेक रोगी आढळल्याने यावर इलाज शोधण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.

एक गोष्ट .

दोन मित्र होते... खूप छान मित्र होते ..
इतकं कि एकाला फटकावला कि दुसरं भोकड पसरायचं...
.
मोठी झाली...
आणि एका मित्राच्या life मध्ये एक मुलगी आली...
दुसरा तसाच खेळकर होता... त्या दोघानाची मैत्री ज|म घट्ट होती..
पण पहिला जास्त वेळा मैत्रिणी सोबत घालवायला लागला...

मैञी दिन...!!

म्हणजेच Friendshi Day
मराठीत मैञी दिन म्हटलं तर पटकन लक्षात नाहि येत,
तेच जर Friendshi Day म्हटलं तर
लगेच डोळ्यां समोर येतात ते College Day's
त्याच Day's मधिल हाही एक महत्वाचा दिवस.
पण याचा उगम का झाला?
कुठे झाला?
कधि झाला?
या बद्दल आपन विचारच नाहि करत ?
फक्त enjoy करायच बस !

जेव्हा मित्रांत भांडण होतात... तेव्हा...

माफ कर मित्रा मला, मोठी चूक झाली यार,
त्या चुकीसाठी एवढी शिक्षा खूप झाली यार.
त्यादिवशी आपण एकमेकांशी विनाकारण भांडलो,
मग तू माझ्याशी कधीही न बोलण्याची शपथ घेतलीस,
तू माझ्याशी बोलणं सोडलस आणि मला एकट केलंस,
तोंड असून माझ्याकडे मला मुकं करून टाकलस,
खरंच सांगतो, मी आजकाल फारसं कुणाशी बोलत नाही रे,
बोलण्याकरता अनेक गोष्टी सुचतात आणि आतल्या आत विरतात...
तू जरी बोलणं सोडलस, तरी मी मात्र तुझ्याशी आजही पूर्वी इतकाच बोलतो,
पूर्वी फक्त मी तुझ्यातल्याच तुझ्याशी बोलायचो,
आज मी माझ्यातल्या तुझ्याशी बोलतो...
आजकाल तू मला नेहमीच टाळतोस,
मी असेन जिथे, तेथून तू पळ काढतोस,
थांबावं लागलंच तुला, तर माझ्या आरपार तू पाहतोस,
इतर मित्रांमध्ये तू खूष आहेस, आनंदात आहेस,
हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्नही करतोस,
कधी एकदा माझ्याकडे, माझ्या डोळ्यांकडे बघ,
खात्रीनं सांगतो, मी त्याही वेळेस तुझ्याच कडे बघत असणार......


ते पण एक वय असतं....


ते पण एक वय असतं
दिवसभर पाळण्यात झोपायचं
सगळ्यांकडून कौतुक
करून घेण्याचं

Thursday, August 4, 2011

का ग तु अशी वागतेस गं......


तुला पाहिलं कि हृदयाची घंटा वाजते.
तुझि उपस्थिति अख्ख्या जगाचं सुख देउन जाते.
तुझ्या बरोबर जगलेले दिवस,
आयुष्याला खुप आठ्वणी देउन जातात.
मग अलगद विचारावसं वाटत ,
का ग तु अशी वागतेस ..

कधी कधी माझा मी........




कधी कधी माझा मी
मलाच उमगत नाही
भेटती सारे सगे नव्याने
परी मी गवसत नाही.........




भास्-आभासांचा रंगे
खेळ हा सारा......
कधी स्तब्ध किनारे
कधी वादळी वारा
ह्या वार्‍यावर भरकटताना
मी मजला अडवत नाही.....
...........................कधी कधी माझा मी

फक्त तुज्यासाठी.............

तो अश्रू...
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटं वाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,

Wednesday, August 3, 2011

१४ विद्या आणि ६४ कलां

प्राचिन कालापासुन आपल्याकडे १४ विद्या आणि ६४ कलां

चौदा विद्या
चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकूण चौदा
वेद : १. ऋग्वेद २. यजुर्वेद ३. सामवेद ४. अथर्ववेद

देवदास


तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..
रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले..
तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..
आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

नसेल जाण, तर गेली उडत.. मी खैर करणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.....


बदलत चालले जग सरे, नाही इथे कुणी कुणाचा
स्वार्थी बनत चालला माणूस, काळ बदलतोय माणुसकीचा.....

ज्यांनी केले लहानाचे मोठे, त्यांना आज मुले विसरली
स्वता राहिले उपाशी तापाशी, मुलांच्या जीवनात सूखे भरली
रात्रण दिवस मेहनत करुनी, स्वता ओढली दुखाची सावली
त्याच मुलांनी घरा बाहेर काढुनी, गळा घोटला मनवतेचा.....

हीच आहे का आजची पीढी, प्याशन पैशापाठी धावत चालली
आई वडीलांनी घाम गालुनी, मुलांसाठी अनेक स्वप्न पाहीली
यांच मुलांनी हाकलून देताच, स्वप्न यांची अश्रुंनी वाहीली
अरे देव कोणी पाहीला नाही, पण देवारा असतो हा प्रतेक घरचा.....

भरत चालली आज वृध आश्रमे, जड वाटू लागले आई बाप
उतरत्या वयात सहारा छिनूनी, मुले करतात मोठे पाप
आई वडिलांना पैशाने तोलतात, विसरून जातात कर्तव्याचे माप
काय म्हणायच या पिढीला, स्वार्थ आहे हा आंधळे पणाचा.....

देवालाही जे जमले नाही, ते दिले आज आई वडिलांनी
पैशापुढे सर्व विसरले, मुले नाही त्यांची ऋणी
मुले असून नसल्या सारखे झाले, अनाथ झाले हे म्हातारपणी
आजच्या पिढीस सागने आहे, अपमान करू नका त्यांच्या ममतेचा.

Monday, August 1, 2011

व्रते



आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि कार्तिक या चार महिन्यांचा चातुर्मास हा खरे म्हणजे व्रतवैकल्यांचा काळ. आषाढ महिन्यात दक्षिणायन चालू होते. या काळात देव शयन करतात, अशी समजूत आहे. देव झोपी जातात, तेव्हा आसुर प्रबळ होतात. त्यांचा त्रास मानवाला होऊ नये म्हणून या काळात अधिकाधिक उपासना करण्याच्या दृष्टीने या चार महिन्यांत अधिकाधिक व्रतवैकल्ये येतात. हल्लीच्या काळी पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आणि धर्माचरणाच्या अभावामुळे व्रते करण्याचे महत्त्व कमी झाले आहे किंवा त्याचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. व्रते श्रद्धापूर्वक आणि शास्त्रानुसार केल्याने त्यातून चैतन्य मिळून ईश्वराप्रती भाव वाढण्यास साहाय्य होते. म्हणून या काळातील व्रते समजून घेऊ..


जिवंतिका पूजन
    आषाढ महिन्यात येणार्‍या अमावास्येला जिवंतिका अमावास्या, असेही म्हणतात. दीपपूजनाबरोबरच या दिवशी जिवंतिका पूजनही केले जाते. जिवंतिका पूजनाचे हे व्रत श्रावण महिन्यात दर शुक्रवारी करतात. जिवंतिका उर्फ जिवती या व्रताची देवता होय. ही लहान मुलांचे रक्षण करणारी आहे. पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात. हल्लीच्या काळात छापील चित्रांचीही पूजा केली जाते. परंपरेनुसार श्रावणातील शुक्रवारी सायंकाळी पाच लेकुरवाळ्या सुवासिनींना घरी बोलावून हळद कुंकू लावतात व दूध साखर आणि फुटाणे देतात.

मंगळागौरीचे व्रत
    श्रावण महिन्यातील आणखी एक महत्त्वाचे व्रत म्हणजे मंगळागौरीचे व्रत. मंगळागौर ही एक सौभाग्यदात्री देवता आहे. नव्याने लग्न झालेल्या मुलींनी हे व्रत करायचे असत. लग्न झाल्यानंतर पहिली पाच ते सात वर्षे श्रावणातल्या प्रत्येक मंगळवारी हे व्रत केले जाते. या दिवशी शिव, गणपति आणि गौरी यांची पूजा केली जाते.
    ही झाली श्रावण महिन्यातील काही महत्त्वाची व्रतं. श्रावण महिन्यातील अन्य वारांच्या दिवशीसुद्धा त्या त्या वारांप्रमाणे काही जण व्रत पाळतात.

दीपपूजन
    आषाढ महिन्यात येणार्‍या अमावास्येला दीपपूजन करतात. या दिवशी घरातील दिवे, उदा. समया, निरांजन स्वच्छ घासून उजळाव्यात़ नंतर चौरंगावर अथवा पाटावर थोड्याशा अक्षता घ्याव्यात व त्यावर दिवे ठेवावेत. गंध-अक्षता लावून व फुले वाहून त्यांची पूजा करावी.

श्रावणी सोमवारचे व्रत
    श्रावण महिन्यात अनेक जणांकडून केले जाणारे एक महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवारचे व्रत. श्रावणातील प्रत्येक सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन पूजा करायची असते़  या दिवशी निराहार उपवास करावा किंवा नक्त भोजन करावे, असे सांगितलेले आहे. निराहार उपवास म्हणजे फक्त आवश्यकतेनुसार पाणी ग्रहण करणे. नक्त भोजन म्हणजे सूर्यास्तानंतर तीन घटकेच्या काळामध्ये संपूर्ण दिवसभरात एकदा भोजन करणे.





शिवामूठीचे (शिवमुष्टी) व्रत
    शिवमुष्टी हे व्रत श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी केले जाते. सुवासिनीने लग्नानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार करावयाचे हे व्रत आहे. हे व्रत करतांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी - तांदुळ, दुसर्‍या सोमवारी - तीळ, तिसर्‍या सोमवारी - मूग व चवथ्या सोमवारी - जव किंवा गहू या धान्यांच्या पाच मुठी देवावर वहाव्यात. शिवामूठ शिवपिंडीवरती वहायची असते. हे व्रत शिवमंदिरात जाऊन करतात. ज्यांना ते शक्य नसते त्या घरच्या देवघरातील शिवपिंडीला शिवामूठ वहातात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी फक्त एक वेळ आहार घेऊन शिवलिंगाची पूजा करावी. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ )




ज्येष्ठा गौरीचे व्रत
    देव आणि दानव यांच्यातील संघर्षामध्ये देवांवर आलेले संकट दूर होण्यासाठी देवस्त्रियांनी महालक्ष्मीची प्रार्थना केली आणि मग श्री महालक्ष्मीने हे संकट दूर केले. तेव्हापासून या प्रसंगाची आठवण म्हणून आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण श्री महालक्ष्मीने करावे, यासाठी ज्येष्ठा गौरीचे व्रत करण्यात येते. ऋषीपंचमीनंतर मूळ नक्षत्रावरती गौरींची स्थापना करण्यात येते. त्यासाठी दोन मुखवटे घरी आणण्यात येतात. एक मुखवटा असतो, तो ज्येष्ठा गौरीचा आणि दुसरा असतो कनिष्ठा गौरीचा. तीन दिवस हे मुखवटे ठेवण्यात येतात. गौरींना निरनिराळ्या प्रकारचा नैवेद्य देण्यात येतो आणि नंतर तिसर्‍या दिवशी या मुखवट्याचे विसर्जन करण्यात येते. काही ठिकाणी  मुखवट्यांच्याऐवजी खडे आणले जातात. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ )

अनंत चतुर्दशी
     अनंत चतुर्दशी हे व्रत भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस केले जाते. या व्रताची देवता अनंत म्हणजेच श्री विष्णु आहे. हे व्रत करतांना चौरंगावर किंवा पाटावर तांदुळ ठेवून त्यावर गंगाजल असलेला कलश ठेवतात. त्यात आंब्याची पाने घालून त्यावर ताम्हन ठेवतात व ताम्हनात तांदुळ ठेवतात. नंतर त्यात आठ सुपार्‍या ठेवतात. त्यावर डाव्या बाजूला पुरुष व उजव्या बाजूला स्त्रीचे प्रतीक म्हणून दोरा मांडतात. नंतर त्यांची पूजा करतात. ही पूजा शक्यतो दांपत्याने करावी. अपवादात्मक परिस्थितीत एकट्या पुरुषाने किंवा स्त्रीने ही पूजा केली तरी चालते. अनंत व्रत झाल्यानंतर पूजेतील अनंताचा दोरा पुरुषांच्या उजव्या दंडाला, तर स्त्रियांच्या डाव्या दंडाला बांधतात. हा दोरा पुरोहिताकडून बांधून घ्यायचा असतो. अपवादात्मक परिस्थितीत पती-पत्नी हा दोरा एकमेकाला बांधू शकतात. हा दोरा एक वर्ष तसाच धारण करावा. दुसर्‍या वर्षी दुसर्‍या दोर्‍याची पूजा झाल्यावर तो जुना दोरा विसर्जित करावा किंवा पुरोहिताला दान करावा. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ)




ऋषीपंचमी
स्त्रिया ऋषीपंचमीचे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमीच्या दिवशी करतात.
उद्देश
मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यामुळे कळत-नकळत जे दोष लागतात, त्याचा स्त्रियांवर, पुरुषांवर आणि वास्तूवरसुद्धा अयोग्य परिणाम होतो़  त्यांच्या निवारणासाठी हे व्रत करावे. स्त्रियांवर होणारा अयोग्य परिणाम ऋषीपंचमीच्या व्रतामुळे कमी होतो. तसाच तो गोकुळ अष्टमीच्या व्रतामुळेसुद्धा कमी होतो.
या दिवशी स्नान करून अरुंधतीसह कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वसिष्ठ या सप्तर्षींची पूजा केली  जाते. पूजेसाठी पाटावर किंवा चौरंगावर तांदुळाच्या आठ पूजा घालून त्यावर सात ऋषी व एक अरुंधती, यांच्यासाठी आठ सुपार्‍या मांडाव्यात. पूजेच्या सुरुवातीला ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागले असतील त्यांच्या निराकरणासाठी व अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करतात व त्यानंतर त्यांची शोडषोपचारे पूजा करतात. पूजेमध्ये सप्तर्षींना वहाण्यासाठी तुळस, आघाडा, बेल, रुई, शमी व धोत्रा या पत्रींचा समावेश करतात. पूजेनंतर ऋषींचे विसर्जन करावे असा विधी आहे. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा व बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे.
    पूर्वी ऋषी मुनी सकळी । नित्य पिकवती साळी ।।
    ऐसे त्यांचे मंत्र प्रबळी । महातपस्वी पुण्यपुरुष ।।
याचा अर्थ असा आहे - पूर्वीच्या काळी महातपस्वी पुण्यापुरुष असे हे ऋषीमुनी आपल्या मंत्रसामर्थ्याच्या आधारे रोज साळी हे धान्य पिकवत असत. या दिवशी या ऋषीमुनींच्या मंत्रसामर्थ्याचे आणि त्यांच्या अपरिग्रह वृत्तीचे स्मरण करत व्रत करावे.
     ऋषीपंचमी हे व्रत १२ वर्षे करावे आणि त्यानंतर या व्रताचे उद्यापन करावे. उद्यापन केल्यानंतरसुद्धा हे व्रत चालू ठेवता येते. (संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक, उत्सव व व्रते’)


 व्रतांचे काही नियम
  व्रत करणार्‍यान क्षमा, दया, दान, सत्य अशा गुणांची जोपासना करायला हवी. व्रत पाळतांना काही पथ्य व्रत करणार्‍यान सांभाळायला हवे. यामधे शरीराला मस्तकाला तेल लावणे, विडा खाणे, धुम्रपान करणे, चोरी करणे मनोविकार बळावतील अशा गोष्टी करणे, लोभ आळस, राग, अशा सर्व गोष्टी व्रत पाळणार्‍याने टाळायला हव्यात. व्रतकाळामधे कोणतेही औषध घेण्यास हरकत नाही.

50 Superb & Free PSD Files From Dribbble To Learn From The Best

  Either for self-promotion or simply for goodwill and to help others, the truth is that finding free resources and inspiration can be a really easy task. If you are an experienced designer, you know the best way to learn is by just looking and studying other people’s work. PSD files can be a powerful way to learn and fulfill your work expectations.
Today, one of the main references for this purpose is definitely Dribbble. Dribbble is not only an awesome place to be inspired by many talented designers. You can actually stumble upon some fantastic free PSD files and examine them and learn more.
This collection includes some fantastic UI kits, a lot of assets for web and graphic design, as well as a few cool icons. These PSDs are as perfect for learning as they are for your future projects. Personally I haven’t practiced learning from PSDs lately but by checking out some of these I surely realized how much you can learn from a well-built PSD.
50 Superb & Free PSD Files From Dribbble To Learn From The Best

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers