Demo Site

Thursday, July 19, 2012

आषाढ अमावस्या


आषाढ अमावस्या म्हणजे ‘दिवळी अमावस्या‘ किंवा ‘दिव्याची आवस‘ असे म्हणतात . हल्ली त्याला ‘गटारी‘ हे घाणेरडं नाव का दिलं आहे कुणास ठाऊक…..!
गटारी आमावस्या चा अर्थ नुसते दारू पिऊन धुंद होत मांस-मच्छीवर आडवा हात मारणे असा आहे का.......?,
की…..,याचे आणखीनही काही दुसरे महत्त्व आहे….!
हे…..आपल्याला माहीत आहे का.....? 


पूर्वी घरातले सर्वच्या सर्व दिवे पितळेचेच असत.
त्या दिवशी ते घासूनपुसून लख्ख करायचे. संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचं.कणे-रांगोळी घालून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळद-कुंकू, अक्षता, फुलं वाहायची.गोडाचा नैवेद्य ठेवायचा. लामण दिव्याने त्या प्रज्वलित केलेल्या सगळ्या दिव्यांना आरती ओवाळायची. आषाढी अमावस्येला दीपपूजेला महत्त्व असतं.


अशा या दीप आमावस्येला दिव्यांची पूजा करून सर्वाना “तमसो मा ज्योतिर्गमय” असा संदेश देऊन आषाढ आमवस्या साजरी करुया
सर्वाना दीप आमावस्येच्या ज्योतिर्गमय शुभेच्छा !!!


माहिती स्त्रोत - स्मिता टिकले

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

लेखनाधिकार

myfreecopyright.com registered & protected Creative Commons License
upakram by upakram.blogspot is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 2.5 India License.
Based on a work at upakram.blogspot.com.
Permissions beyond the scope of this license may be available at http://upakram.blogspot.com/.

Followers